सागरी व्यापार - आव्हान आणि संधी
सागरी व्यापार - आव्हान आणि संधी अनेक शतके सागरावरील वाहतुकीच्या बाबतीत भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचा देश होता. मात्र काही कारणांमुळे शतकभरापूर्वी सागरी वाहतुकीतला देशाचा वाटा २५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर पोहचला. त्यामुळे भारत सरकारने पुढील दशकभरात या क्षेत्रातील देशाचा वाटा १० टक्यांपर्यंत नेण्याचे उद्ष्टिय ठेवले आहे. यामुळे सागरी वाहतुकीची वाढ गतिने होणार असल्याने या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढेल. त्याअनुषंगाने इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने सुरु केलेले अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. भारत सरकारच्या सागरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरु करता येतात. या संस्थेचे देशात सहा ठिकाणी कॅम्पस आहेत. सागरी वाहतूक उद्योगाच्या गरजा भागवणाऱ्या सध्याच्या काळाशी सुसंगत असणाऱ्या या अभ्यासक्रमांमुळे या संस्थेतील ७० टक्क्यांहून उमेदवारांना चांगले प्लेसमेंट मिळाले आहे. करिअर संधी या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तं...