Posts

Showing posts from June, 2023

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

Image
  अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट अग्निवीर ( अग्निपथ ) योजनेंतर्गत तिनही दल स्वतंत्रपणे भरती प्रक्रिया राबवतील. मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निर्धारित केली जाईल. तसा उल्लेख, प्रत्येक दलाच्या अग्निवीर जाहिरातीमध्ये केला जाईल. ( वायुसेना अग्निवीर महिलांची संख्या ही सेवेच्या गरजेनुसार ठरवली जाईल. ) वायुसेना अग्निवीर             फक्त अविवाहित मुले आणि मुलीच या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेच्या कालावधीत संबंधितांना लग्नबंधनात अडकता येणार नाही. पुरुष उमेदवाराची उंची किमान १५२.५ सेमी तर महिला उमेदवारांची उंची १५२ सेमी असावी. वय आणि उंचीच्या योग्य प्रमाणात वजन असावे. छाती, वय आणि उंचीच्या योग्य प्रमाणात असावी. इतर शारीरिक आरोग्याची ( कान- नाक- डोळे ) मानके जाहिरातींमध्ये नमूद करण्यात येतात. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. या अग्निवीरांच्या निवडीसाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता निर्धारित करण्यात आली आहे. ( १ ) विज्ञान विषय- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजीचा ...

हर काम देशके नाम...

Image
हर काम देशके नाम... सैन्यदलात जाण्याची बऱ्याच मुलामुलींची इच्छा असते. वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना अशी संधीही मिळत असते. १२ वी नंतर मुले/मुली नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमीच्या माध्यमातून सैन्य दलात प्रवेश करु शकतात. पदवीनंतर कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या माध्यमातून अशी संधी मिळू शकते. इंडियन एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्टव्दारे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदासाठी भरती केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून अग्निवीर ( अग्निपथ ) योजना सुरु करण्यात आली असून, या योजनेव्दारे लष्काराच्या तिनही दलात दहावी आणि बारावी झालेल्या मुलामुलींची निवड केली जाते. अग्निवीर, ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना असून जगातील अनेक महत्वाच्या देशांमध्ये अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्याव्दारे लष्कारातील विविध कामगिरींसाठी उपयुक्त ठरु शकणाऱ्या प्रतिभावंत आणि अमाप उर्जा असलेल्या तरुण-तरुणींची निवड केली जाते. लष्कराला अशाप्रकाराच्या मनुष्यबळाची कमरता भासू नये या अनुषंगाने ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत तिनही दलांसाठी सुयोग्य उमेदवारांची निवड चार वर्षांसाठी केली जाते. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामक...

तंत्रनिकेतनाचे महत्व

Image
  तंत्रनिकेतनाचे महत्व महाराष्ट्रातील शासकीय तंत्रनिकेतनांचा दर्जा आणि दर्जा आणि गुणवत्ता बऱ्याच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपेक्षा उत्तम आहे. कालानुरुप वेगवेगळे अभ्यासक्रम सुरु करण्याची लवचिकता सुध्दा या तंत्रनिकेतनांनी दाखवली आहे. या शासकीय संस्थांची वैशिष्ट्‌ये पुढील प्रमाणे सांगता येतील- ( १ ) या संस्थांमध्ये प्लेसमेंट सेल उघडण्यात आले असून, त्याव्दारे विद्यार्थ्यांना विविध उद्योग आणि कारखान्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जाते. ( २ ) इंटर्नशीपची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. ( ३ ) या संस्थांमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि उच्च प्रशिक्षित अध्यापक आहेत. ( ४ ) या संस्थांमध्ये १० वी, १२ वी ( विज्ञान/ टेक्निकल/ व्होकेशनल उत्तीर्ण ) आणि कोणत्याही ट्रेड माधून १० वी नंतर आयटीआय ( इंडस्ट्रिअल टेक्निकल इंस्टिट्यूट ) केलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. महत्वाच्या संस्था आणि अभ्यासक्रम ( १ ) शासकीय तंत्रनिकेतन मुंबई- या संस्थेला शासनाने स्वायतत्ता प्रदान केली आहे. या संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांमध्ये उद्योगातील सहा महि...