इलेक्ट्रिकल व्हेईकल:नवी संधी
इलेक्ट्रिकल व्हेईकल:नवी संधी भारत सरकारने शुध्द आणि हरीत पर्याववरणासाठी वातावरणातील कर्ब उत्सर्जन कमी करण्याच्या अनुषंगाने विविध धोरणे आखली आहेत. त्याचाचा एक भाग म्हणजे इलेक्ट्रिकल वाहनांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे हे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा यावर विशेष भर आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर काही सुट आणि सवलती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अशी वाहन खरेदी करण्याची कर्ज प्रकिया सुलभ करण्यात आली आहे शिवाय आयकरातही काही सुट देण्याचे प्रयोजन आहे. भारतात इलेक्ट्रिकल चार चाकी, दुचाकी, मोठ्या बसेस,ऑटो रिक्शा यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०२२ मध्ये हिरो इलेक्ट्रिक या कंपनीने अशी १ लाखापेखा अधिक दुचाकी वाहने उत्पादित केली. २०२३ मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कर्ब उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टिने पडलेले हे महत्वाचे पाऊल ठरत आहे. अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावायला लागणे याचा अर्थ भारताचा खनिज तेलाच्या आयातीवरचा खर्च कमी होणे असा होतो. कर्ब उत्सर्जनात घट आणि परकीय चलन...